नवी मुंबई मंगळवार, २७ ऑगस्ट २०२४: घणसोली येथे शहरातील सर्वात मोठ्या आणि भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष प्रसंगी स्वराज्याचे अध्यक्ष संभाजी महाराज छत्रपती उत्साही उपस्थित राहून आपल्या विचारांनी आणि भाषणाने लाखो उपस्थितांचा उत्साह द्विगुणित केला. मनाच्या स्वराज्याची ही पहिलीच दहीहंडी असल्यामुळे या ठिकाणी नवी मुंबईकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
हजारो पदाधिकारी आणि १०,००० हून अधिक समर्थकांसोबत लाखोंच्या संख्येने नवी मुंबईकर या दहीहंडीच्या साक्षीदार झाले. संभाजी महाराज छत्रपती यांनी या कार्यक्रमादरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी रणशिंग फुंकत सर्व पदाधिकाऱ्यांना जोमाने आणि कठोर परिश्रमाने कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यांच्या जोशपूर्ण भाषणामुळे उपस्थितांमध्ये नवा उत्साह संचारला.
संभाजी महाराजांनी आपल्या भाषणात नवी मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातील भावी आमदार अंकुश बाबा कदम यांच्या विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली. त्यांनी अंकुश कदम यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, त्यांच्या चांगल्या कार्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचा विजय मोठ्या मताधिक्याने होईल, अशी सकारात्मक चिन्हे दिसत आहेत.
अंकुश बाबा कदम यांनी आपल्या भाषणात नुकत्याच सिंधुदुर्ग येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांवर कठोर टीका करत सांगितले की, शिवरायांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेसाठी दोन्ही सरकारांची उदासीनता जबाबदार आहे. या विषयावर कदम यांनी शिवरायांच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला.
अंकुश कदम यांच्या या वक्तव्याने नवी मुंबईकरांच्या मनात राजकीय जाणिवा आणि आपल्या नेतृत्त्वाविषयी विश्वास वाढवला आहे. त्यांनी नवी मुंबईतील जनतेला दिलासा देत सांगितले की, शिवरायांचा आदर्श कायम ठेवण्याचे आणि त्यांच्या कार्याचा आदर करण्याचे आपले कर्तव्य आहे, आणि या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
या दहीहंडी उत्सवाने नवी मुंबईकरांच्या मनात नवचैतन्य निर्माण केले आहे. संभाजी महाराज छत्रपती आणि अंकुश बाबा कदम यांच्या प्रेरणादायी भाषणांनी येथील राजकीय वातावरणाला एक नवी दिशा दिली आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये नवी मुंबईतील राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.