महाराष्ट्रात बलात्काराच्या घटनांचा कहर: न्याय हवा, भीख नको!

महाराष्ट्र: महाराष्ट्रातील बलात्काराच्या घटनांनी मराठी जनतेच्या हृदयात संतापाचा ज्वालामुखी प्रज्वलित केला आहे. आजचं भयंकर उदाहरण आहे बद्लापूरमध्ये चार वर्षाच्या निरागस चिमुकलीवर झालेला बलात्कार. या निर्दयी आणि विकृत कृत्याने अख्ख्या राज्याला हादरवून टाकलं आहे. 

 लोकांचा संताप आता उफाळून आला आहे. आम्हाला केवळ गोडगोड शब्द, अल्पं, किंवा १५०० रुपयांचे दाखले नकोयत! 'लाडकी बहिण' योजनेतून १५०० रुपये देऊन मुलीचं भविष्य सुरक्षित होतं का? नाही! न्याय हा ठोस हवा आहे, आणि त्वरित हवा आहे. आरोपींना जराही दया दाखवू नका! हा एक साधा गुन्हा नाही, हा आपल्या समाजाच्या मुळावर घाला आहे. सरकार आणि न्यायालयांनी आता कठोर पावले उचलली नाहीत, तर लोकांचा राग उफाळून येईल, आणि तो नियंत्रणात ठेवणं शक्य होणार नाही. 

किती काळ आम्ही या बघ्याच्या भूमिकेत राहणार? आम्हाला आता न्याय हवा आहे, आणि तो देखील कडक शिक्षा देऊन मिळालेला न्याय! बलात्कारासारख्या नीच कृत्यांसाठी कोणत्याही प्रकारची दया दाखवली जाऊ नये. अशा पिशाच्चांना फाशी द्यावी, जेणेकरून भविष्यात कोणीही असे क्रूर कृत्य करण्याचं धाडस करणार नाही. 

 महाराष्ट्रातील लोक आता जागे झाले आहेत. त्यांनी न्यायासाठी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. सरकारने हे लक्षात घ्यावं की आम्हाला अल्पं नको, आम्हाला न्याय हवा आहे - तो देखील दया-माया न करता, तात्काळ आणि ठोस न्याय!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने