घाटकोपरकरांनो, पावसामुळे सतर्क रहा – राखी जाधव यांचे आवाहन

घाटकोपर पूर्व विभागात गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. या पावसामुळे नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीत अडचणी येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई नेत्या राखी जाधव यांनी या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घाटकोपर पूर्व विभागातील सर्व ब्लॉकेज पॉईंट्सची प्रत्यक्ष पाहणी केली. 


राखी जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पाणी पूर्णपणे ओसरत नाही तोपर्यंत घराबाहेर पडू नये. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहनांच्या हालचाली ठप्प होऊ शकतात, तसेच अपघात होण्याची शक्यता आहे. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी सतर्कता बाळगण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. 

घाटकोपर पूर्वमधील सर्व नागरिकांनी आपली सुरक्षा लक्षात घेऊन प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे त्यांनी सांगितले आहे. 

#घाटकोपर #मुंबईपाऊस #सतर्करहा #राखीजाधव #राष्ट्रवादी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने