नेरूळ स्थानकाची दुरावस्था आणि तेथे चालू असलेले अवैध धंदे याविरोधात स्वराज्य पक्षाने गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाशी पत्रव्यवहार करून समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. तथापि, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, आणि परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे.
स्वराज्य पक्षाने पुढील आठवड्यात जनतेच्या स्वाक्षरी मोहीमेचे आयोजन करून मोठे जनआक्रोश आंदोलन पुकारण्याचा निर्धार केला आहे. या आंदोलनात नेरूळच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून प्रशासनावर दबाव आणता येईल आणि योग्य ती कारवाई घडवून आणली जाईल.
स्वराज्य पक्षाची भूमिका ठाम
"आम्ही नेरूळ स्थानकातील दुरावस्था आणि अवैध धंद्यांविरोधात गेल्या दोन वर्षांपासून लढत आहोत, परंतु प्रशासनाला जाग येत नाही. म्हणून आम्ही आता शेवटचा इशारा देत आहोत. जर येत्या आठ दिवसांत प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, तर आम्ही मोठे जनआक्रोश आंदोलन करणार आहोत," असे स्वराज्य पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितले.