मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने छाप पाडलेले ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेबाबत केलेल्या बेताल विधानांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सोलापूरकर यांनी एका यूट्यूब मुलाखतीत दावा केला की, महाराजांनी मिठाईच्या पेटाऱ्यांमध्ये लपून सुटका केली हा इतिहास खोटा असून, प्रत्यक्षात त्यांनी मोठ्या प्रमाणात लाच देऊन सुटका करून घेतली.
शिवभक्तांचा रोष – 'शिवरायांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही!'
राहुल सोलापूरकर यांचा अभिनय कौतुकास्पद असला तरी त्यांची सद्यस्थिती पाहता असं वाटतं की, त्यांनी आता विवेक गमावला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे लाखो शिवभक्तांचा रोष उफाळून आला आहे. शिवरायांच्या इतिहासाशी छेडछाड करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र माफ करणार नाही!
अभिनेते किरण माने यांच्यासह अनेक कलाकार आणि नागरिकांनी या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ‘मराठी इंडस्ट्री अशा भिकारचोटांनी खच्चून भरली आहे. असल्या टुकारांना शाहू महाराजांच्या भूमिका दिल्या गेल्या तरी यांच्या मेंदूतलं शेण तसंच आहे!’ अशा परखड शब्दांत टीका होत आहे.
नवा संवादची ठाम मागणी:
१. राहुल सोलापूरकर यांनी तातडीने खुलासा करून जाहीर माफी मागावी.
2. संबंधित यूट्यूब चॅनेलने सदर मुलाखत त्वरित हटवावी, अन्यथा त्यावर बंदी घालण्यात यावी.
3. या प्रकारावर सरकारने लक्ष घालून, भविष्यात कोणीही शिवरायांचा अपमान करणार नाही यासाठी कठोर कायदे करावेत.
4. शिवप्रेमींनी अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या कलाकारांना पाठिंबा देऊ नये आणि त्यांचा बहिष्कार टाकावा.
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रत्येकाला धडा शिकवायलाच हवा! महाराष्ट्राने इतिहास विकृत करणाऱ्यांना सहन करायचं नाही, हे आता सिद्ध करून दाखवण्याची वेळ आली आहे!