पाच वर्षांपूर्वीचा ‘थाळीनाद’ आणि लॉकडाऊनचा वाढदिवस – आठवणी की शिक्षेचा टाहो?

22 मार्च 2020 – एक ऐतिहासिक दिवस!


देशात करोनाची चाहूल लागली होती. सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या आणि 19 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा केली. 22 मार्च 2020 रोजी संपूर्ण देश ‘स्वतःहून’ घरात बसला. पण या एका दिवसात देशाचा भाग्यविधाता बनण्याचा मोह अनावर झाला आणि संध्याकाळी 5 वाजता “थाळ्या वाजवा, घंटा वाजवा, टाळ्या वाजवा” असा आदेश देण्यात आला. हळूहळू लोक त्यात एवढे रमले की सणासुदीचा उत्सव असल्यासारखे थाळ्या आणि ताटं फोडली जाऊ लागली.



पाच वर्षांनंतरही आठवणी ताज्या!


आज 22 मार्च 2025. तब्बल पाच वर्षे झाली त्या ऐतिहासिक ‘जनता कर्फ्यू’ला. पण त्याचा परिणाम देश अजूनही भोगतोय.

थाळ्या वाजवल्याने करोना पळाला का?

उत्तर सगळ्यांना माहिती आहे – नाही! उलट, त्यानंतर 24 मार्च 2020 ला देशभर संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला. 21 दिवसांच्या कडक बंदीनंतर तो वाढवला जात राहिला आणि शेवटी 2021 पर्यंत जनजीवन उध्वस्त होत राहिले.

थाळ्या वाजवल्याचा नंतर काय फायदा झाला?

काहींना आत्मसंतोष मिळाला, तर काहींना हास्यास्पद आठवणी! थाळ्या वाजवून करोनाला हुसकावून लावण्याच्या वैज्ञानिक पुराव्याशिवायच्या युक्तिवादांवर आजही मिम्स तयार होतात.

लॉकडाऊनमुळे कोणाचं भलं झालं?

मोठ्या कंपन्या आणि ऑनलाइन व्यवसाय वाढले, पण करोडो मजूर आणि रोजंदारीवर काम करणारे लोक बेरोजगार झाले. अनेकांचे उद्योग-धंदे उध्वस्त झाले.


सार्वजनिक भावना – ‘हसावं की रडावं?’


आज, सोशल मीडियावर ‘लॉकडाऊनचा वाढदिवस’ साजरा केला जातोय. पाच वर्षांपूर्वी फोडलेल्या थाळ्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. अनेकांना अजूनही त्या दिवशी केलेल्या ‘नाद’साधनेची आठवण आहे. काहींना लॉकडाऊनमुळे उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याची वेदना आहे.


पुन्हा होईल का असं काही?


इतिहास हा शिकण्यासाठी असतो, पुन्हा तोच धडा गिरवण्यासाठी नाही. आशा आहे की, भविष्यात अशा वैज्ञानिक आधार नसलेल्या गोष्टींवर विश्वास न ठेवता लोक सजग होतील. नाहीतर पुढच्या संकटाच्या वेळी “मोबाईल टॉर्च लावा, गॅस जाळा, कुकरची शिट्टी वाजवा” असं काहीतरी सांगितलं जाईल, आणि आपण पुन्हा पाच वर्षांनी याचं ‘वाढदिवस’ साजरा करत राहू!


– नवा संवाद, विशेष रिपोर्ट


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने