रायगड जिल्हा युवक कार्यकारिणी जाहीर – महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या युवा अभियानाला नवी दिशा

१० जून २०२५ | छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या युवा संघटनात्मक बांधणीला नवसंजीवनी मिळाली असून, नुकतीच रायगड जिल्हा युवक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय राजाराम जाधव आणि पक्षाचे उपाध्यक्ष श्री अंकुश कदम (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली आकारास आली आहे.



सत्तेच्या झगमगाटापेक्षा समाजाशी बांधिलकी, युवांमध्ये नेतृत्व घडवणं आणि “गाव तिथं शाखा – घर तिथं स्वराज्य” ही भूमिका अंगीकारणं, या हेतूने महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पाय रोवले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजीराजांच्या विचारांना प्रेरणास्थानी ठेवत, युवकांच्या नेतृत्वात बदल घडवण्याचा संकल्प या निवडीतून स्पष्टपणे दिसून येतो.


नुकत्याच जाहीर झालेल्या युवक कार्यकारिणीत अँड ओंकार विंदू सावंत यांची रायगड जिल्हा युवक अध्यक्षपदी, अजित घाडगे यांची उपाध्यक्षपदी, अमित शिर्के यांची सचिवपदी निवड झाली आहे. दिगेश काळोखे यांच्याकडे सहसचिवपद, मनोहर पाटील यांच्याकडे युवक संघटकपद, तर सचिन माने आणि प्रशिकेश घुडे यांच्याकडे उपसंघटकपद सोपवण्यात आले आहे.


ही संपूर्ण कार्यकारिणी पुढील सहा महिन्यांसाठी कार्यरत राहणार असून, त्यानंतर कामगिरीचा आढावा घेत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. या निवडीमुळे जिल्हास्तरावर युवक संघटन अधिक सक्रीय होणार असून, गावागावात पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी नवीन उर्जा मिळेल, असा विश्वास युवक विभागाचे मुंबई विभाग अध्यक्ष श्री संतोष कदम यांनी व्यक्त केला.


डॉ. धनंजय जाधव, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस, हे पक्षाचे धोरणात्मक आणि वैचारिक चेहरा आहेत. त्यांनी विविध सामाजिक चळवळी, युवक संघटन, आणि राज्याच्या राजकीय व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी ठोस भूमिका घेतली आहे. त्यांचे भाषण, विश्लेषण आणि संयोजन कौशल्य ‘स्वराज्य’ च्या कार्यपद्धतीला एक दिशा देणारे ठरले आहे.


दुसरीकडे, अंकुश कदम (बाबा) हे पक्षाचे एक कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांचा कार्यकर्ता वर्गाशी असलेला थेट संपर्क, युवकांमधील विश्वास, आणि ‘गावपातळीपासून राज्याच्या धोरणांपर्यंत’ सक्रिय सहभाग, यामुळे त्यांनी पक्षात एक सशक्त विश्वासार्हता निर्माण केली आहे. रायगड युवक कार्यकारिणी तयार करताना त्यांनी संघटनात्मक स्थैर्य, कार्यकर्त्यांची कामगिरी, आणि भूमिकेची स्पष्टता यावर विशेष भर दिला.


ही संपूर्ण कार्यकारिणी म्हणजे फक्त नावे आणि पदे नव्हेत, तर ही आहे एक समर्पित, यशस्वी आणि सजग युवा टीम — जी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या ध्येयधोरणांवर निष्ठा ठेवून, “स्वराज्य” चा मंत्र घराघरात पोहोचवण्याचं कार्य करत राहील.


शेवटी, युवकांचे हे नेतृत्व म्हणजे पक्षाच्या भावी वाटचालीचा कणा आहे. विचार, कृती आणि संवाद यामध्ये स्वच्छता ठेवून, जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणं हीच खरी दिशा आहे आणि रायगड जिल्हा युवक कार्यकारिणी त्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने