ऐरोली विधानसभेचा सर्वेक्षण भाग 1: स्थानिकांचे मत आणि प्रश्न

आज नवा संवाद ची टीम ऐरोलीच्या सेक्टर 1, 1A, आणि 2 या विभागांमध्ये होती. ऐरोलीचा हा भाग इतर भागांपेक्षा थोडा वेगळा आहे, कारण येथे विविध धर्म आणि जातींचे लोक एकत्र राहतात. काही लोक आधुनिक इमारतींमध्ये राहतात, तर काही अजूनही चाळीत राहत आहेत. काहींनी 7/12 कोऱ्या जमिनीवर संसार थाटला आहे, तर काही गावठाण भागात वास्तव्य करतात.

ऐरोलीमध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत आणि याचसोबत छोटे-मोठे दुकानेही दिसतात. भागाचा विकास भरभराटीत असला तरी, स्थानिकांच्या समस्या तितक्याच गंभीर आहेत. येथील रस्ते स्वच्छ असले तरी, पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी आहेत. इमारती आणि कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये 24 तास पाणीपुरवठा होत असला तरी, चाळीतील लोकांना पाण्याची कपात सहन करावी लागत आहे.










स्थानीय समस्या आणि असमानता:

येथील रेशन दुकानांमध्ये लोकांना शासन धोरणानुसार पुरेशा प्रमाणात धान्य मिळत नाही. विशेषत: मूळ मराठी रहिवाशांना नोकरीच्या संधींमध्ये अनेक अडचणी येत आहेत. ऐरोलीतील वाढत्या कॉर्पोरेट संस्कृतीत स्थानिक मराठी माणसांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे, ज्यामुळे स्थानिक मराठी समाजात नाराजी आहे.

लोकसंख्या आणि सांस्कृतिक विविधता:

ऐरोली हा विभाग सांस्कृतिकदृष्ट्या खूप समृद्ध आहे. येथे विविध जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. येथील प्रमुख सण-उत्सवांमध्ये गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी हे प्रमुख आहेत. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची उत्सुकता दिसून येते, परंतु स्थानिक मराठी माणसांच्या समस्यांकडे फारसे लक्ष दिले जात नाही, असे काही रहिवाशांचे मत आहे.

ऐरोलीतील राजकीय चित्र:

आज ऐरोलीत काही ठिकाणी बॅनर लावलेले दिसले, ज्यावर मोठ्या अक्षरात हेडलाइन होती: "कोण होणार ऐरोलीचा आमदार?" पण त्यावर कोणाचाही फोटो नव्हता.

नवा संवाद टीमने स्थानिकांशी संवाद साधला असता, त्यांनी आपले विचार मांडले. ऐरोलीतील आगामी निवडणुकीत तीन प्रमुख नावे पुढे येत आहेत: गणेश नाईक, विजय चौगुले, आणि अंकुश (बाबा) कदम. बहुतेक जणांचे यावर एकमत होते की ह्याच उमेदवारांमध्ये स्पर्धा होईल.

गणेश नाईक: त्यांनी ऐरोलीमध्ये अनेक मोठ्या कंपन्या आणल्या आहेत, परंतु स्थानिक मराठी माणसांना या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी न मिळणे, ही त्यांच्याविरोधात जाणारी बाब ठरली आहे.

अन्य प्रमुख उमेदवार:
दुसरीकडे, अंकुश (बाबा) कदम यांनी दहीहंडी, गणेशोत्सव, आणि वसंत हनकरे गुरूजींचे कार्यक्रम आयोजित करून जनसंपर्क वाढवला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेले कार्यक्रम, तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्यामुळे ते सर्व समजांना स्वतःच्या जवळचे वाटतात. त्यांच्या स्वराज्य पक्षाचे समर्थन वाढत आहे.

एक युवक म्हणाला, "युवा नेतृत्व, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी स्वराज्य घडवण्याचे स्वप्न पाहणारे 'अंकुश बाबा कदम.', ऐरोली विधानसभा गाजवणार यात शंका नाही.

काही लोक गणेश नाईक यांना समर्थन देताना दिसले, तर काहींनी एम के मढवी यांचे नाव पुढे केले.

मते विभागणी आणि तिसरा उमेदवार:

ज्येष्ठ नागरिकांनी स्थानिक मतदारांच्या गप्पांमध्ये आपल्या शंकाही मांडल्या. ते म्हणाले, "नाईक साहेब भाजपमध्ये आहेत, तर चौगुले साहेब शिवसेना शिंदे गटात. म्हणजे दोघांना तिकीट मिळणार नाही आणि मिळवायचे असेल तर एकाला पक्ष बदलावा लागेल. असं झालं तर मतविभागणी होऊन तिसराच उमेदवार बाजी मारून गेला तर?" तिसरा उमेदवार कोण असेल, असे विचारले असता त्यांनी प्रतिप्रश्न केला, "तुम्हाला काय वाटतं?कोणीतरी अंकुश कदम असे म्हटल्यावर, त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य हे त्यांचे उत्तर देत होते.

(नवा संवाद टीमचे पुढील सर्वेक्षण लवकरच...)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने