लढाईत विजयाचे पहिले पाऊल! दिवदेव वाडीतील नागरिकांचा स्वराज्य पक्षात प्रवेश

आगामी विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत, ऐरोली विधानसभेचे स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश बाबा कदम यांना दिवदेव वाडीतील नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्याने त्यांचा विजय अधिकच नक्की झालेला दिसतो. अंकुश बाबा कदम यांनी आपल्या संदेशात जाहीर केले की, जावळी तालुक्यातील दिवदेव वाडी या गावातील तसेच नवी मुंबईतील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना पाठिंबा देत स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे.




कदम यांनी भावनिक शब्दात सांगितले, "लढाईत आपली माणसं आपल्या सोबत असणं हा पहिला विजय असतो!" दिवदेव वाडीतील आणि नवी मुंबईतील नागरिकांनी व्यक्त केलेल्या या पाठिंब्यामुळे कदम यांना राजकीय आणि सामाजिक ताकद मिळाली आहे. त्यांनी यावेळी सर्वांचे आभार मानत नम्रपणे सांगितले, "आपल्या माणसाच्या मागे आपणच उभं राहिलं पाहिजे हा शुद्ध हेतू मनात ठेवून दिलेला हा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे."

या पाठिंब्यामुळे ऐरोली विधानसभेत स्वराज्य पक्षाला नवचैतन्य प्राप्त होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दिवदेव वाडीतील आणि नवी मुंबईतील नागरिकांनी दाखवलेला विश्वास निवडणुकीत मोठा बदल घडवून आणू शकतो, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

स्वराज्य पक्षाच्या या नव्या उभारीने ऐरोली विधानसभेत चुरशीची लढत पाहायला मिळेल, आणि या पाठिंब्याने अंकुश बाबा कदम यांच्या निवडणुकीची रणनीती अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने